Tuesday, October 27, 2020

मानसिकता

    एका नाजूक विषयावर लिहावंसं वाटलं आणि बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती देखील लिहायची पण नाजूक विषय म्हणून हात धजावत नव्हते लिहायला. पान आज हिम्मत करतोय लिहायची आणि अपेक्षा करतो तुमच्याकडून विषय आवडला तर फक्त जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये फॉरवर्ड करायची.

बऱ्याच वर्षांपासून आपण मुलींवरच्या अत्याचाराची प्रकरणं ऐकतोय, वाचतोय आणि वृत्तवाहिन्यांवर त्याचे विश्लेषण पण ऐकतोय. जेव्हा अशा घटना घडतात त्यावर बऱ्याच वेळा आपण एकमेकांशी चर्चा करतो, जास्तीत जास्त शिक्षा होयला हवी किंवा सरकारने कडक कायदा करायला हवा अशा कृत्यांसाठी अशी आपण बरीच बडबड करतो, पण काही दिवसांनी आपण आपापल्या कामात गुंतून जातो आणि मग हा विषय परत दुसरी घटना होईपर्यंत थंड पडतो.
मित्रांनो खरं म्हणजे हा विषय एकदम सुटणारा नाही आहे, एकीकडे आपण मुलगी शिकली प्रगती झाली असं म्हणायचं आणि दुसरीकडे मुलींवर शाररिक मानसिक अत्याचार करायचे, अशी जर मानसिक अवस्था असेल आपली तर हे कधीच थांबणार नाही. मला असं वाटते की हे जर थांबवायचं असेल किंवा ह्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत नसेल येऊ द्यायच्या तर सुरुवात ह्या बदलाची आपल्या घरातून होयला हवी.
आजच्या social नेटवर्किंगच्या जगात पालक मागे राहिलेत आणि मुलं पुढे निघालीत ज्यामुळे पालक आणि मुलांमध्ये संवाद कमी झालाय. काय आहे ना आजकालचे पालक मुलांना स्मार्ट फोन घेऊन दिला कि आपली जवाबदारी संपली ह्या अविर्भावात राहतात. सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात घ्या 10 पैकी 5 मुलींवरचे अत्याचार हे परिचयातल्या लोकांनी केलेले असतात आणि ह्याला जवाबदार कोण तर सोसिअल नेट्ववर्किंगवर पालकांनी मुलांना दिलेला फ्रीडम. आपला मुलगा किंवा मुलगी कोणाबरोबर बोलते, त्यांचं friendcircle कसं आहे, ते कोणाला भेटतात वैगरे अशा गोष्टी पालकांना माहिती असायला हवं. मुलं रात्री बेरात्री social अँप वर कोणाशी गप्पा मारतात कींवा काय बघतात हे पालकांनी विचारायला हवं, बऱ्याच वेळेला मुलं बाहेर पडतात हे सांगून की अमुक एका व्यक्तीला भेटायला जातोय आणि पालक पण हो म्हणतात कारण कधी तरी त्यांनी पण त्या व्यक्तीचे नावं ऐकलेलं असतं, पण ती व्यक्ती कशी आहे, काय करते आणि आपल्या मुलाचं त्याच्याशी काय नातं आहे ह्याची माहिती पालकांना असायला हवी जे पालक करत नाही.
आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही आणि मग पुढे अशा काही गोष्टी बाहेर होतात आणि मग आपण मुलांच्या चुकींना दोष देत बसतो, पण टाळी एका हाताने कधी वाजत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. मुलगा जर चुकीच्या मुलांच्या संगतीत राहिला तर तो त्यांच्या चुकीच्या गुणांच अनुकरण करणार आहे, आणि मुलगी जर जास्त मुलांमध्ये राहिली तर तिचा बिंधास्तपणाचा कधी ना कधी कोणी तरी मानसिक किंवा शाररिक फायदा घेणारच. आपण पालक म्हणूंन व्यक्तिस्वातंत्र आणि व्यभिचार ह्यातला फरक मुलांना वेळीच समजावून सांगितला तर मला वाटते आपण मुलांच्या बाबतीत बऱ्याचशा चुकीच्या घटना टाळू शकतो.
आपण खूपवेळा आपला मुलगा कींवा मुलगी शिकलेली आहे त्यामुळे तिला सगळंच कळत ह्या अविर्भावात राहतो आणि आपली मुलं पण त्याच अविर्भावात राहतात. बाप आणि मुलगा ह्याने समोर दारूचे दोन पेक एकत्र बसून प्यायल्याने कींवा मुलीने त्याच्या मित्राला घरी बोलावून बेडरूम मध्ये एकत्र गप्पा मारल्याने पालकांविषयीचा धाक कमी नको होयला, पालक आणि मुलांमध्ये मित्रत्वाचा नातं जरूर असावा पण पालकांनी चुकीच्या गोष्टींमध्ये मुलांचा कान पण पिळायला हवं जेणेकरून मुलांमध्ये थोडी तरी आदर वजा भीती असायला हवी. परत एकदा सांगतो व्यक्तिस्वातंत्र मुलांना द्यावा पण त्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मुलं गैरफायदा तर घेत नाहीना हे वेळोवेळी तपासून पण पहा.
मला असं देखील वाटते जेवढी पालकांची जवाबदारी आहे तेवढीच मुलांची देखील आहे स्वतःला सुरक्शित ठेवायची तसेच चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये रहायची. मुलींनी ज्या मुली social networking अँप चा वापर करतात त्यांनी बघाव की त्यांचा मित्र किती adult पेज ला follow करतो, त्याचे मित्र त्याच्या पोस्ट वर किती abusive भाषेत कंमेंट करतात, त्याचं पोलिटिकल मत किती चुकीच्या पद्धतीने तो social site वर मांडतो. ह्या सगळ्या गोष्टींचा माणूस म्हणून त्या मित्राला ओळखायला तुम्हाला मदत होईल, वरवर चांगले बोलणारा मित्र आतून कसा आहे हे ओळखणं पण तेवढच महत्वाचं आहे. पुढची ठेच मागचा हुशार हि म्हण नेहमी लक्षात ठेवा.
मुलांना मोठं करायला पालकांच आयुष्य जातं आणि हीच मुलं जेव्हा हाताबाहेर जातात कींवा त्यांच्या बरोबर काही तर अघटित घडत तेव्हा डोक्यावर हात लावायची पाळी येते तेव्हा त्यासारखा आयुष्यातला दुर्दैवी क्षण त्या पालकांसाठी कुठलाच नाही असं मला वाटते. संस्कार आणि पाश्चिमात्य संस्कृती ह्यांचा balance जर पालकांनी मुलांच्या आयुष्यात ठेवला तर मला वाटते समाजात फार कमी चुकीच्या घटना घडतील आणि आपली मुलं चांगल्या विचारांची होतील.
एका मुलीचा बाप झाल्यावर मला असं वाटते माझी जवाबदारी खूप वाढली आहे, आणि मला जर माझ्या मुलीला समाजातल्या वाईट नजरांपासून वाचवायचं असेल तर चांगले संस्कार तर करावेच लागतील पण चांगलं वाईट काय आणि कसं ओळखायचं ह्याचं शिक्षण पण तेवढंच आत्मीयतेने द्यावं लागणार आहे. माझं कुटुंब माझी जवाबदारी हे जे आपण करोना साठी आज राबवतोय तेच आपण मुलांच्या चांगल्या विचारांसाठी आणि भवितव्यासाठी राबवूया, म्हणजे सुरुवात जर प्रत्येकाने आपल्या घरातून केली तर नक्कीच मुलांच्या विचारात आणि कृतीत काही तरी चांगलं घडेल.
मी आज हे जे काही लिहिलंय ते माझ्या बाहेरच्या घडणाऱ्या घटना आणि जवळच्या काही लोकांचं वागणं ह्यातून आलेल्या अनुभवातून लिहिलंय. आशा करतो तुम्हा सर्वांना ते पटेल आणि तुम्ही सर्व आणि तुमचे मित्रपरिवार ह्याचा जास्तीत जास्त प्रसार करून ह्याच महत्व इतरांना पटवून द्याल.
धन्यवाद!!
- स्वप्निल पातकर (27/10/2020)

No comments:

Post a Comment

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...