मित्रांनो आज दसरा एक विशेष सण ज्याचं महत्त्व खूप आहे पण fashion च्या दुनियेत ह्या सणाचं महत्व आजकालच्या लोकांना माहिती नाही.
मी मराठी शाळेत शिकलोय अर्थात त्यावेळी इंग्रजी माध्यम नव्हतं आणि असतं तरी आमची ऐपत नव्हती तिकडे शिक्षण घ्यायची, असो तर मुद्दा हा आहे कि मराठी शाळेत असल्यामुळे ह्या सणाचं महत्व फार जवळून जाणलं आहे. लहान असताना दसऱ्याची कधी शाळेला सुट्टी नसायची पण शिकवत पण नसत त्या दिवशी. त्या दिवशी शाळेमध्ये दसऱ्याचा सण साजरा होयचा, दसरा म्हणजे काय तर विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा, आता ही पूजा शाळेत पाटीवर सरस्वती मातेचं चित्र कडून त्याची फुल, हळद कुंकू वाहून पूजा करायची आणि मग सगळ्यांनी एक सुरात मास्तरांच्या सुरात सूर मिसळून आरती म्हणायची. ह्यातली गम्मत अशी कि शाळेत असलेल्या सर्व मुलांचा एकत्र टाळ्या वाजवण्याचा आवाज एवढा सुरात असायचा कि आजकालच्या मंडळाच्या आरत्यांना पण तो कधी येत नाही. बरं सरस्वती मातेचं चित्र काढण्यात पण स्पर्धा असायची त्यामुळे ज्याचं पाटीवरच चित्र चांगला त्याची शाळेत भाव असायचा, काही विध्यार्थी स्वतःहून चित्र काढायची पण मी मात्र आमच्या वडिलांकडून काढून घ्यायचो आणि आजही मला ते चित्र काढणं जमत नाही.
तर हा सण विद्येच्या देवीचा असतो आपली प्रगती ज्या गोष्टीमुळे होते त्या सर्व गोष्टी म्हणजे एक प्रकारची विद्येची माताचं असते, काहीजण कॉम्पुटरची पूजा करतात कारण ते त्यांच्या मिळकतीचा साधन असतं, काही जण शस्त्र, काहीजण पुस्तकं तर काहीजण धातूची पूजा करतात. बरं संध्याकाळी सोनं द्यायची पद्धत असते, बरं सोनं म्हणजे काय तर आपट्याच्या झाडाची पानं, ती पण आपण आपल्या जवळच्या व्यक्तींमध्ये घरी जाऊन वाटतो आजकाल जी लोकं जाऊ शकत नाही कींवा आळशी असतात ती whatsapp वर वाटतात , ह्या मागचा हेतू फक्त एवढाच असतो कि एकमेकांना पान वाटून आपण एकप्रकारची जवळच्या व्यक्तींची भेट घेतो जेणेकरून काही कटुता आली असेल त्यांच्यामध्ये तर ती नाहीशी होते. शेवटी काय नात्यामध्ये जेवढा संवाद आणि भेट तेवढे त्यात मतभेद कमी...असो.
आजकालच्या काळात ह्या सणाला फॅशनच वलय देऊन खरं महत्व पुसून टाकलंय, मला नाही आठवत आम्ही लहान असताना किंवा कॉलेज मध्ये असताना कधी गरबा कींवा दांडियाचा नाव एकलं असेल कींवा त्याचा कुठे अतिरेक झालाय अस पण नाही बघितल. पण आज ह्या सणाचा खरं महत्व फक्त दांडिया आणि गरबा एवढंच राहिलाय, बरं पारंपरिक खेळ म्हणून ह्या खेळाकडे बघितलं असतं लोकांनी तर ठीक होत पण एक business म्हणून बघितलं जाते आहे आणि नृत्य कमी आणि थिल्लरपणा जास्त वाढलाय. पालक सुद्धा आपल्या लहान मुलाला सजवून पारंपारिक वेषभूषा करून त्यात भाग घ्यायला लावतात, म्हणजे लहानपणापासून हेच ह्या सणाचं महत्व हे त्याच्यावर बिंबवलं जातं. ज्या देवीने नऊ दिवसात राक्षसाचा वध केला तिला सुद्धा हे जे काही नऊ दिवस चालते ते बघवत नसेल.
ह्या सगळ्यात विद्येची देवता माँ सरस्वती मागे पडते आणि प्रत्येकाला त्याचा विसर पडलाय. बुद्धीच्या देवतेचा विसर जर पडायला लागला तर हेच होणार ना जे आजकालचे पैसेखाऊ लोक करता आहेत. संस्कार सगळे विसरलेत आणि मला वाटते आज खरं तर चांगल्या संस्काराची गरज आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कारण प्रत्येकजण स्वार्थासाठी जगतोय, आई वडील ह्यांचा विसर पडत चालाय, महिलांवरील अत्याचार, आणि विशेष म्हणजे फक्त स्वतःसाठी जगता आहेत आजची लोकं. ह्या लोकांच्या घरात माँ सरस्वतीचा वास नाही आहे म्हणून आज हि लोक अशी वागता आहेत. शेवटी आई वडिलांच पण चुकतं फ्रीडम म्हणजे काय हे जर लहानपणापासून शिकवलं असतं तर आज सगळंच सुंदर दिसलं असतं.
मला तरी वाटते ह्या दसऱ्याला आपण सर्वानी पाटीवर माँ सरस्वतीचं चित्र काढून तिची विनम्र पूजा करून आपल्या घरात तिचं अखंड वास्तव राहावं आणि संस्काराची हि प्रथा अशीच उत्तरोउतर चालत राहो अशी प्रार्थना करूयात.
मित्रानो जे मला पटते ते मी लिहितो त्यामुळे पटलं तर प्रसार करा नाही पटलं तर सोडून द्या शेवटी सगळ्यांनाच व्यक्तिस्वातंत्र्य आहे नाही का 
*तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा* 
-स्वप्निल पातकर
No comments:
Post a Comment