Saturday, October 16, 2021

समजूतदारपणा

    आज मोबाईलवर काही तरी चाळत असताना एक मोटिवेशनल वाक्य कानावर पडलं ते म्हणजे "समोरच्याला आपण त्याच्यासाठी कोण आहोत हे जर नाही समजलं तर फार मोठी गल्लतहोते"

  मला हे वाक्य आजच्या युगात खूप relate झालं कारण आपण एखाद्या बरोबर हसतोमस्ती करतो त्याच्यासाठी पाहिजे तेव्हा वेळकाढतो पण ती व्यक्ती आपण आणि दुसरा ह्यामध्ये जेव्हा निवडण्याची वेळ येते तेव्हा मात्र ती व्यक्ती दुसऱ्याला निवडून निघून जातेम्हणजे आपल्याला कोणी तरी गृहीत धरते आहे हे आपल्याला जर नाही कळलं तर फार मोठा प्रॉब्लेम होतो आणि मग आपण त्यागोष्टीचा विचार करत बसतो आणि स्वतःच आयुष्य हरवून बसतोमित्रांनो कोणी किती जवळ का असूदेतकिंवा तुम्ही त्या व्यक्तीसाठीकितीही काहीही करा पण त्या व्यक्तीची सवय नका करून घेऊआणि विशेष म्हणजे समोरचा पण तोच विचार करतोय का जो तुम्हीविचार करताय हे वेळोवेळी समजून घ्यायचा प्रयत्न करामाणसं तुमचा उपयोग करून घेतात आणि तुम्हाला depression मध्ये सोडूनजातातह्या situation मध्ये यायच्या आधी समोरच्याला आपण कोण आहोत ह्याची खातरजमा करून स्वतः भवती एक लक्ष्मणरेषाआखून घ्या.

  -स्वप्निल पातकर @miswapnilpatkar

Sunday, August 15, 2021

स्वातंत्र्यदिन विशेष

    75 व्या स्वतंत्रदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छाखरं म्हणजे स्वातंत्र्यदिनाचं महत्व खूप मोठं आहे पण आपण ते एक सार्वजनिक सुट्टीम्हणून समजून कमी केलाय.

   आपला देश 1947 ला स्वतंत्र जरूर झालाय पण अजूनही आपल्याकडे जातीभेदआरक्षणनिरक्षरतास्त्रीभ्रूण हत्यास्त्रियांनाअजूनही पुरुषानं इतकेच सगळीकडे महत्व प्राप्त झाले नाही अशा अनेक समस्या जशाच्या तशा आहेतआपला देश ह्या सगळ्यांमधूनजो पर्यंत स्वतंत्र होत नाही तो पर्यंत खऱ्या अर्थाने आपण देश स्वतंत्र झाला असा म्हणता येणार नाहीकुरघोडीच्या पॉलिटिक्सच्याविळख्यातून जेवढ्या लवकर देश स्वतंत्र होईल तेवढ्या लवकर देशाचा विकास होईलगावा  गावात प्रगत शिक्षण आणि खेळाविषयीमहत्व जो पर्यंत पोहचत नाहो तो पर्यंत आपला देश काही स्वतंत्र झाला असा वाटत नाहीशेतकऱ्यांची आत्महत्यासावकारांची अरेरावीराजकारण्यांची शिक्षणसंस्था तसेच मोठ्या आर्थिक पेढीवर असलेली मक्तेदारी जो पर्यंत जात नाही तो पर्यंत आपला भारत देश स्वतंत्रझाल्यासारखा वाटणार नाही.

     असे अनेक सामाजिक प्रश्न आहेत जे आपण स्वतःहून पुढाकार घेऊन सोडवले पाहिजेतआज आपण फक्त जागेवर बसून दुसर्यानेकाय तरी करावं अशी अपॆक्षा करतोयजो पर्यन्त हि मानसिकता कमी होत नाही तो पर्यंत भारत देश स्वतंत्र झालाय असं वाटणार नाहीतर मित्रांनो हि अशी खंत वर्षानु वर्ष चालूच राहणार आहे असं वाटते त्यामुळे प्रत्येकाने काही तरी  वसा घेऊन वर्षाला एक तरी सामाजिककार्य करावा जेणेकरून एखाद्याच्या प्रगतीला हातभार लागेलबाकी हे माझा वयक्तिक मत आहे त्यामुळे पटलं तर आत्मसात करा आणिदेशाच्या विकासात भाग घ्यासर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! भारत माता की जय!!!

Monday, August 2, 2021

मैदानी खेळ प्रबोधनाची गरज

     आज मी महिलांची हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपालची biography वाचत होतो आणि कसं एका cycle ओढून दिवसाला 80 रुपयेकमावणाऱ्या वडिलांनी मुलीला हॉकी खेळण्यासाठी मदत केली हे वाचून थक्क झालोअर्थात सगळेच नॉनक्रिकेट प्लेयरची अशीचकाही तरी गाथा आहे म्हणजे घरात काही नसताना त्यांनी खेळासाठी सर्वस्व पणाला लावून देशाचं नाव मोठ केलंयतुम्ही बघाना पिटीउषाअंजु जॉर्जेमेरी कोमगीता फोगट हि काही मला माहिती असलेली नाव ज्यांनी घरची परिस्थिती खराब असताना पण खेळामध्येनाव कमावलं आणि देशाचं नाव उंचावलं.

   आज जर आपण आजूबाजूला बघितलं तर असे किती तरी पालक बघाल ज्यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली असते तरी देखीलते आपल्या मुलांना खेळात प्रोत्साहन देण्यापेक्षा CBSE, ICSE बोर्ड मध्ये शिक्षण देण्यासाठी शेजारच्या मुलाबरोबर compete करतात

मला आठवते मी जेव्हा मुंबईच्या ओव्हल ग्राउंडआझाद मैदान वरून जायचो तेव्हा फक्त क्रिकेट प्रॅक्टिस करणारी मुलं दिसायचीपणफुटबॉल च्या ग्राउंड वर  हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच मुलं दिसायचीहॉकी कुठे दिसलं नाहीइव्हन टेनिस कोर्ट वरशुकशुकाट असायचाहे सगळं बघून पालकांच्या मानसिकता लक्षात येते कि जिथे पटकन फेमस होता येते अशा खेळात मुलांनाप्रोत्साहित करतातआज हॉकी मध्ये बोलाटेनिस मध्ये बोलाबॉक्सिंग बोला, athelitics बोला तुम्हाला फक्त कुठून तरी छोट्याकुटुंबातील आलेली खेळाडूच दिसेल पण  आपल्यासारख्या प्रगत राज्यातील मुलं मुली दिसणार नाही

   आपल्या शाळेत जेवढे मैदानी खेळ खेळले जायचे किंवा आजही जे खेळले जातात ते सरकारने सगळ्या शाळांना मग त्या CBSE, ICSE माध्यम असो त्यांना अनिवार्य (compulsary) करायला पाहिजेतसेच ह्या शाळांना सुद्धा असे खेळ स्टेटनॅशनल लेवल मध्येखेळायला विध्यार्थाना प्रोत्साहित करायला पाहिजेआणि एक गोष्ट आता प्रत्येक शाळा जे parents मीटिंग ठेवतात त्यातविध्यार्थ्यांच्या अभ्यासाची प्रगती discuss करतात तेवढेच महत्व पालकांना मुलांना खेळात सुद्धा प्रगती करावी ह्यासाठी प्रबोधनकरायला पाहिजेप्रभोधनाशिवाय प्रगती नाही आणि ही नीती जर शाळांनी नाही अंगिकारली तर आपली मुलं फक्त online खेळातपारंगत होतील आणि त्या खेळाला आपण जास्त महत्व देऊ शकत नाही.

    कृपया सर्वांनी मैदानी खेळांना प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करूयात जेणेकरून खेळ हा प्रत्येक शालेय अभ्यासक्रमात compulsary विषय बनला पाहिजे आणि त्यात पण पास आणि नापास असे निकष असायला हवे तरच मुलांना ह्या मैदानी खेळात रस निर्माण होईलआणि ह्यातून राष्ट्राला किती तरी चांगले खेळाडू मिळतील आणि आपण पण आपल्या देशाला पदक पालिकेत अग्रस्थानी बघुयात.

    मित्रांनो आपल्यात पण काही शिक्षक मित्र मैत्रिणी आहेत /असतील यांनी हा विषय लावून धरा तुमच्या लेवल वर जेणेकरून हे कुठेतरी ऐकलं जाईल आणि त्याची मदत मुलांना होईल आणि त्यांचे पालक प्रेरित होऊन खेळाला प्रोत्साहित करतीलधन्यवाद!!!

  • स्वप्निल पातकर 02082021

मराठी भाषा दिन

     मित्रांनो   आज   मराठी   भाषा   दिन   आहे ,  हा   दिवस   म्हणजे   फक्त   शुभेच्छा   देऊन   कींवा   मराठी   गाणी   लावून   साजरा   करण्य...